No products in the cart.
राजर्षी शाहू महाराज विचारधारा । दहा पुस्तिकांचा संच
Description
- Language: मराठी
- Pages: 260
- Binding: Paperback
- भारतीय परिस्थितीत सामाजिक न्याय हा अत्यंत महत्वाचा विचार आहे. राजश्री शाहू महाराज यांनी याचे महत्त्व ओळखून आपल्या संस्थानात समाजातील तळागाळातील घटकांसाठी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवण्याचे क्रांतिकारी धोरण सर्वप्रथम राबवले. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून सामाजिक न्यायाच्या धोरणाची समग्र अंमलबजावणी सुरू केली. लोकवाङ्मय गृहातर्फे शाहू महाराजांच्या स्मृति शताब्दीनिमित्ताने सुप्रसिद्ध लेखक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी संपादित केलेल्या दहा पुस्तिकांचा संच प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. लोकवाड्मय गृहाची ही शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आदरांजली ठरणार आहे. आमचे असंख्य वाचक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील याची खात्री आहे.
– कॉ. भालचंद्र कानगो
Reviews
There are no reviews yet.